आंबिवलीतील वीजप्रवाह सुरळीत

| पाताळगंगा | वार्ताहर |

आंबिवली गावातील बस स्टॉप येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे गेले अनेक दिवस वीजपुरवठा खंडित होत होता, त्याचबरोबर यांचा मानसिक त्रास येतील ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. सदर ग्रामस्थांच्या समस्या विचारात घेता माजगाव सरपंच दीपाली पाटील त्यांच्यासमवेत विद्यमान सदस्यांनी पुढाकार घेत शुक्रवारी या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत केला.

जुन्या ट्रान्सफॉर्मरमुळे विजेचा प्रवाह कमी अथवा जास्त होल्टेजमध्ये येत होता. त्याचबरोबर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन खालापूर येथील अभियंता मुंढे, एमएसबी चौक अभियंता अभिजित बोधनकर यांच्याशी सातत्याने संपर्क करून या ठिकाणी नवीन विजेचा ट्रान्सॅफार्मर बसविण्यात आला.

Exit mobile version