| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील कोन गावातील प्रबोध नंदकिशोर म्हात्रे याने आपले सैनिकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेमध्ये सैन्य भरती झाल्याने कोण ग्रामस्थांच्या वतीने त्याचा अग्ननिवीर म्हणून सन्मान करण्यात आला. त्याची अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलात चार वर्षासाठी निवड झालेली असल्याने त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक दोन वर्षे तो कोल्हापूरमध्ये एका सैनिकी अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता. कोल्हापूरला सैनिकी अकॅडमीमध्ये शिक्षण घेऊन देशासाठी काही तरी करायचे हे ध्येय मनाशी बाळगून त्याने आपले शिक्षण पूर्ण करून त्याची भारतीय सैन्य दलात अग्नीवर म्हणून निवड झाल्याने संपूर्ण गावाला त्याचा अभिमान असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोन ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित या सत्कार समारंभाला ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी शिसवे, अक्षय घरत, दीपक म्हात्रे, साहिल म्हात्रे, सदस्या निकिता घरत, नीता म्हात्रे, धनराज बडे, संजय जाधव, अस्मिता गायकर, ताईबाई पाटील, अंजनी पाटील, रमेश तारेकर, जितेश शिसवे, आदेश घरत, काशिनाथ म्हात्रे, अनंत दिघे, सरोज मात्रे, शिल्पा म्हात्रे, मनीषा म्हात्रे, प्रचिता दिघे, निर्मला म्हात्रे या सर्वांच्या उपस्थितीत प्रबोध म्हात्रे याचा सत्कार करण्यात आला.
प्रबोध म्हात्रे बनला अग्निवीर
![](https://krushival.in/grygrars/2024/02/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-1024x576.jpeg)