नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना खा.प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीवरील मेरी कहानी या कार्यक्रमाच्या अँकरपदाचा राजीनामा राज्यसभा अध्यक्ष वैंकय्या नायडू यांच्याकडे पाठविला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळावरून आता संसदेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे. संसदेतून निलंबन झाल्यानंतर त्यांनी संसद टीव्हीच्या अँकर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.
प्रियंका चतुर्वेदी संसद टीव्हीवरील मफमेरी कहानीफफ या कार्यक्रमाचे अँकरींग करत होत्या. या कार्यक्रमासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मला अजूनही तो कार्यक्रम आवडतो. मात्र, संसदेतील 12 खासदारांचे मनमानीपणे निलंबन केले आहे. आम्हाला संसदीय कर्तव्य पार पाडण्यासाठी संसदेत जागा नाकारली जात आहे. त्यामुळे आता संसद टीव्हीचा राजीनामा देत आहे, असं प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.