घोडाबंदर येथे प्रकल्पाचे लोकार्पण
। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील घोडाबंदर (नारवेल) येथे खार्या पाण्यापासून गोडया पाण्यात रुपातंर करण्याच्या फिल्टर प्लँटचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अॅड. निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी एईआरएफ या संस्थेने जनतेला पाणीरुपी अमृत दिल्याचे आवर्जून नमूद केले.
अप्लाइड इन्व्हॉर्वमेंट रिसर्च फाउडेंशन ही संस्था अलिबाग आणि पेण तालुक्यात गेली काही वर्षे लोकसहभागातून जंगल संरक्षण, आदिवासींना रोजगार व विकासाच्या संधी मिळवून येण्यासाठी काम करत आहे. मच्छिमारीवर अवलंबून असणार्या स्थानिक लोकांना कांदळवन संरक्षण प्रकल्पात सहभागी करुन घेण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हण्ाून पेण तालुक्यातील नारवेल घोडाबंदर या समुद्र किनार्यावरील वस्तीसाठी व आजूबाजूच्या अनेक गावांसाठी समुद्राचे पाणी शुद्ध करुन पिण्यायोग्य करण्यासाठीचे सयंत्र संस्थेमार्फत बसविण्यात आले आहे.
यावेळी बोलताना निलिमा पाटील यांनी खार्या पाण्यापासून शुद्ध गोडे पाणी करुन पाणीरुपी अमृत येथील जनतेला पाजण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाचे कौतुक करु तेवढे कमीच आहे. समुद्रकाठच्या गावांना गेली अनेक वर्षे पिण्याचे पाणी मिळत नाही आणि ते पावसाचे पाणी साठवून वर्षभर पिण्यासाठी वापरतात. अनेक गावांना नेहमीच ट्रॅकरने पिण्याचे पाणी पुरविले जाते. आणि घरे विखुरलेली असल्यामुळे ते पाणी नेण्यासाठी सुद्धा महिलांना पायपीट करावी लागते. दुर्दैवाने आतापर्यंत या भागातील पिण्याच्या गोडया पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु पदरी यश आले नाही. आमदार धैर्यशील पाटील यांनी तर खारेपाटाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पेण ते मुख्यमंत्री निवासापर्यंत चालत जाऊन 30 कोटींची योजना आणली. परंतु ती योजना काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. परंतु त्या योजनेचा लाभ भविष्यात नक्कीच या जनतेला होईल. मात्र आपण जे कार्य केले आहे, त्याचे कौतुक कितीही केले तरीच थोडेच. असेच कार्य तुम्ही फक्त पेण तालुक्यात रायगड जिल्हयात करावे अशी अपेक्षाही निलिमा पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे जानवली, बहिराम कोटक, तामसी बंदर, शिर्की चाळ नं. 1 व चाळ नं. 2, तसेच विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच लोकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळेल. या सयंत्रातुन दर तासाला 1000 लिटर पाणी शुद्ध केले जाईल व पाण्याच्या एटीएम मार्फत प्रत्येक कुटुंबाला पाणी दिले जाईल. 20 लिटर साठी फक्त 5 रुपये शुल्क आकारले जाईल आता प्राथमिक 100 कार्डंची नोंदणी झाली असून मोबाईल पध्दतीने रिर्चाज केली जातील. तरी याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घेण्याचे आवाहन ए.ई.आर.एफ च्या अश्विनी गोडबोले यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावन अश्विनी गोडबोले यांनी केले. तसेच आपले मनोगत जयंत सरनाईक तसेच जर्मनच्या राजदूत डेबोरा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम), नगरसेवक संतोष पाटील, स्वप्नील म्हात्रे, यशवंत म्हात्रे, अदी उपस्थित होते. तर हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सदानंद मारडकर, भरत दळवी, सुचित्रा नायर, हाशिद त्रिवेदी, जर्मन च्या अर्थसहाय्य करणार्या उर्वशी, प्रफुल्ल म्हात्रे, भावेश म्हात्रे, कैलास गावंड तसेच प्रकल्पासाठी मुंबईतील जर्मन दूतावासाने बहुमूल्य मदत केली आहे.
बांबूच्या सुरेख वास्तूची निर्मिती
भरत दळवी या पुण्यातील कारागिरानी या फिल्टर प्लँटसाठी जी वास्तू तयार केली आहे. ती वास्तू पुर्णतः बांबू पासून तयार केली असून या बांबूला कोठेहे चुकेचा अगर खिळयाचा वापर न करता पुर्णतः खुटयांच्या सहाय्याने जोडकाम केले आहे, तसेच विटा सिमेंटच्या युगामध्ये ही बांबू ची वास्तू पहाण्यायोग्ये आहे. या खार्या पाण्यापासून गोडया पाणी तयार करणार्या प्लँटला भेट दिल्यास बांबूच्या या सुरेख वास्तुच कलाकुसर पाहण्याचा योग येईल.