| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सर्वत्र सुरु असतानाच आपल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणासह आमरण उपोषण करण्यात आले आहे. तर एक आंदोलन करण्यात आले आहे. लाक्षणिक उपोषणामध्ये सरकारच्या आर्थिक खर्च तंतोतंत जुळत नसल्याचा आरोप केला आहे. आमरण उपोषण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने तर आंदोलन मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांबाबत प्रकरण धुळ खात पडून असल्याबाबत करण्यात आले आहे.
राज्य सरकारचा आर्थिक खर्च हा तंतोतत जुळत नाही. त्यामुळे केोट्यावधी रुपयाचां अपहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲड. अजय उपाध्ये यांनी केला आहे. 2028 पासून 2023 पर्यंत झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने त्याची चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी उपाध्ये यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
महिन्याभरापासून जेएसडब्लू कंपनीविरोधात उपोषण सुरु केले आहे. मात्र या साखळी उपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी आता सामाहिक उपोषण सुरु केले आहे. प्रकल्पासाठी जमीनी देऊनदेखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने हे आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच महाड तालुक्यातील दापोली, पणदेरी येथील 412 एकर जिरायत शेतजमीन ऐच्छीक शेतकरी यांनी पाच लाख रुपये प्रति एकरी दराने 2018 मध्ये समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात कागदपत्रासह प्रकरण दाखल केले आहे. त्यावर तालुकास्तरिय व जिल्हास्तरिय समितीने मंजूरी दिली आहे. मात्र 2019 पासून मार्गदर्शनासाठी समाजकल्याण आय़ुक्त पुणे कार्यालयात हे प्रकरण प्रलंबित आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने 105 लाभार्थ्यांचे नुकसान होत असल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे. भीमशक्ती सरचिटणीस गोपाळराव तंतरपाले, प्रचारक उमेश लांगी, डॉ. दिपक कांबळे, अनिल कडू आदी पदाधिकाऱ्यांसह अन्यायग्रस्त लाभार्थी उपस्थित होते.