कांस्यपदक जिंकले
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणार्या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पाडाव केला. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले.तिच्या या विजयाचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले आहे.
या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये 11-8 अशी आघाडी घेतली. यानंतर 16-10, 19-12 अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम 21-12 असा जिंकला. दुसर्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि 5-2 अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.