गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता

नवी मुंबईत 310 खाटांच्या रूग्णालयाचे उद्घाटन

| पनवेल । वार्ताहर ।

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खारघर येथे काढले. भारती विद्यापीठाच्या सेक्टर 10, खारघर, नवी मुंबई येथील अत्याधुनिक अशा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते.

नवी मुंबई आणि आजूबाजूला राहणार्‍या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवणं ह्या उद्देशाने भारती विद्यापीठ मेडिकव्हर रुग्णालयातफेँ नवी मुंबईत 310 खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उदघाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनिल तटकरे, भारती विद्यापीठचे कुलपती प्रो. डॉ. शिवाजीराव कदम, आ. डॉ. विश्‍वजीत कदम, सिडकोचे उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी, कैलास शिंदे, डॉ. अस्मिता जगताप, स्वप्नाली कदम, डॉ. विलास कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

मेडिकव्हर ग्रुपचे संपूर्ण भारतात एकूण 24 रुग्णालये आहेत. रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी या रूग्णालयात आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात रूग्णालयात कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ऑन्कोलॉजी, बालरोग, स्त्रीरोग, पल्मोनोलॉजी, ईएनटी आणि इतर स्पेशॅलिटीजचा समावेश आहे, ज्यामध्ये उच्च पात्र डॉक्टर, विशेषज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारती विद्यापीठाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मानव संशोधन निर्माण केले आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणं हे भारतीय विद्यापीठाची खासियत आहे. पण आता भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर च्या संयुक्त विद्यामाने एक नवीन रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. कोरोना काळानंतर जगभरातील प्रगत देशांनाही आरोग्य क्षेत्रातील उणिवा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे देशासह जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात आपल्याला काम करण्याची गरज लक्षात आली आहे. त्यातूनच आज मोठ्याप्रमाणात परिवर्तन होताना दिसून येत आहे. दोन-तीन दशकांपासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहेत. हेल्थ केअर क्षेत्र हेल्थ टूरिझमच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Exit mobile version