राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई | प्रतिनिधी |
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.यामुळे काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे.राजीव सातव यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे.भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती.

Exit mobile version