• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसी बँक नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती

Krushival by Krushival
September 6, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरडीसीसी बँक नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती
0
SHARES
671
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोजगारनिर्मिती थांबविल्याने तरुणांमध्ये संताप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशातील बेरोजगारीची स्थिती भीषण आहे. शिक्षण घेतले पण नोकरी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोलमजुरी करुन, प्रसंगी पोटाला चिमटा काढून पालकांनी शिक्षण दिले आणि सरकारने रोजगाराचे केवळ आश्‍वासन. आज ग्रामीण भागातील तरुण नोकरीसाठी वणवण करीत आहे. याच बेरोजगारीच्या प्रश्‍नांची गांभीर्याने दखल घेत शेतकरी कामगार पक्षाने हजारो तरुणांच्या हाताला काम दिले, संसार उभा केला. कोणतेही राजकारण न करता केवळ समाजहितासाठी, तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शेकाप काम करीत आहे. मात्र, केवळ विरोधी भावना ठेवून शिंदे सरकारचे आ. भरत गोगावले यांनी सत्तेचा गैरवापर करीत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती प्रक्रियेला विरोध केला आणि सत्तेच्या जोरावर नोकरभरतीला स्थगिती दिली. विधानसभा निवडणुकीचे कारण सांगून तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये सरकारविरोधात नाराजी पसरली असून, तात्काळ ही स्थगिती हटविण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील तरुणांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील तरुण हा तंत्रज्ञानामध्ये प्रवीण असा आत्ममग्न, कुशल आहे. ज्याला पुरेशा शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नाहीत. आजचे तरुण हे उद्याचे शिल्पकार आहेत, ही भावना ठेवून आज शेकापक्ष रोजगारनिर्मितीसाठी अहोरात्र काम करीत आहे.

आधी कोरोना, मग मराठा आरक्षणाचा प्रश्‍न, लोकसभा-विधानसभा निवडणुका, सरकारची अनिश्‍चितता, योजनांची खैरात, नैसर्गिक आपत्ती असा प्रवास करीत उमेद बाळगलेले युवक मनस्तापातून स्वतःलाच दोष देत नोकरीच्या प्रतिक्षेत होते. गरीब आई-बाबांना सोडून शहरात राहणं जमणार नाही. म्हणून आपल्याच जिल्ह्यात कुठेतरी रिक्त पदे भरली जातील आणि आपली गाडी रुळावर येईल, या आत्मविश्‍वासाने ओतप्रोत बेरोजगार आता नोकरभरती प्रक्रियेला मिळालेल्या स्थगितीच्या महाजालात अडकला आहे. सरकारने गेल्या पाच वर्षांत रोजगार देण्याची लालसा दाखवली. मात्र, प्रत्यक्षात फसवणूकच पदरात पडल्याने तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेचा माज दाखवण्याऐवजी विकासाचे राजकारण, तरुणांचे हित, महिलांची सुरक्षितता, आरोग्य सुधारणे आवश्यक आहेे. मात्र, याकडे सत्ताधारी डोळेझाक करीत आहे. रोजगारावर बोलायचं नाही तर बेरोजगारांना दरमहा त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यावर बोलणार्‍या भ्रष्टाचारी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम तरुण करतील, असा सज्जड दम तरुणांनी दिला आहे.

आजपर्यंत आरडीसीसी बँकेत नियमांनुसार आणि कोणताही आर्थिक हितसंबंध न जोपासता नोकरभरती करण्यात आली आहे. बँकेची भरतीची जाहिरात येताच हजारो तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले. नोकरी मिळेल अशी आशा तरुणांना होती. मात्र, शिंदे सरकारने यात अडवणूक केल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर विरजण पडले.

बेरोजगारीचे राजकारण नको!
गेली पाच वर्षे सत्ता उपभोगणार्‍या महायुतीला रोजगारनिर्मितीची अंमलबजावणी करता आलेली नाही. अशा स्थितीमध्ये जर बँक कायद्याच्या चौकटीत रोजगार उपलब्ध करुन देत असेल, तर शिंदे सरकारने त्यात अडथळा आणणे ही लाजिरवाणी बाब असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली आहे.
विकासाचे राजकारण हवे
विविध योजनांची खैरात आणि विकासकामांचे आमिष दाखवून सत्तेत विराजमान झालेल्या सरकारला गेल्या पाच वर्षांत रोजगार उपलब्ध करुन देता आलेले नाहीत. या सरकारने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले आहे. या अपयशी सरकारचे प्रतिनिधीत्व करणार्‍या शिंदे सरकारच्या आमदारांनी विकासाचे राजकारण करण्याचे धाडस दाखविणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तरुणांच्या तोंडाशी असलेला रोजगाराचा घास हिरावून घेतला आहे.
अपयशी सरकार
निवडणुकीपूर्वी मतांसाठी भीक मागत सत्ताधारी नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात रोजगार, रिक्त पदांचा गोषवारा आणि पदे भरण्याची हमी दिली. मात्र, सत्तेत आल्यावर केवळ स्वतःची झोळी भरण्याचे काम त्यांनी केले. कधी आरक्षणाचे कारण, तर कधी आचारसंहितेचे निर्बंध सांगून शिंदे सरकारने बेरोजगारांना केवळ वेठीस धरण्याचे काम केले आहे. केवळ विरोध करायचा म्हणून शिंदे सरकारने नोकरभरती प्रक्रियेत अडथळा निर्माण केला असून, सरकारी अनास्थेमुळे युवकांच्या जीवनाची पुरती वाट लागली असल्याचे मत अवधूत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराचे साधन खुले करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांना रोजगार मिळवून देण्यामध्ये शेकापचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण केल्यास कदापि सहन करणार नाही. शेकाप कायमच युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. बँकेची भरती स्थगित करीत बेरोजगांरांच्या घशातील घास काढण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केले आहे. घाणेरड्या पद्धतीने होत असलेल्या या राजकारणाचा तीव्र निषेध आहे.

चित्रलेखा पाटील,
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख
आगामी निवडणुकीत सरकाला बसणार फटका?
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो तरुणांनी ऑनलाईन अर्ज भरून या प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र, आगामी निवडणुकीचे कारण दाखवून ही भरती प्रक्रिया रद्द केल्याने तरुणांची फार मोठी निराशा झाली आहे. एका बाजूला रोजगार देणार असे सांगून आश्‍वासनांची बोळवण सरकार करीत असताना, दुसर्‍या बाजूला बेरोजगारांना रोजगारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीत शिंदे सरकारला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
राजकीय आकसापोटी बेरोजगारांचा बळीजिल्ह्यात अनेक तरुण उच्चशिक्षित असून, त्यांना नोकरीची गरज आहे. शासनाच्या अधिकृत एजन्सीद्वारे ऑनलाईन पद्धतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती होणार होती. या भरतीवर हरकत घेण्याचे काही कारण नव्हते. परंतु, राजकीय आकसापोटी, विरोधी भावनेतूनच चुकीची माहिती देऊन शासनाला स्थगितीचे आदेश काढण्यास भाग पाडले आहे. राजकीय आकसापोटी बेरोजगारांचा बळी जात आहे. तरुणांना नोकरी मिळण्याची आशा होती. ती संपुष्टात आली आहे. शासनाने याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. तरीदेखील ते कारण दाखवून भरतीला स्थगिती देणे चुकीचे आहे, असे मत शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी तीव्र शब्दात व्यक्त केले.

Related

Tags: alibag newindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPostponement of recruitment processraigadrdcc alibagrdcc banksocial media newssocial news
Previous Post

सुधीर चेरकरला पोलीस कोठडी

Next Post

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
तरुणाचा अपघातात मृत्यू

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?