• Login
Tuesday, December 30, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सांबरकुंड धरण प्रकल्पग्रस्तांना नव्या दराने मोबदला द्या; पंडित पाटील यांची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
October 30, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील
0
SHARES
301
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणासाठी काम तब्बल 40 वर्षे रखडले आहे. शासनाची अनास्था, प्रशासकीय उदासीनता आणि तांत्रिक कारणामुळे या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रियाच रखडली आहे. प्रकल्पाची किंमतही 11 कोटींवरून 742 कोटींवर पोहोचली आहे. मात्र, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला जुन्याच दराने दिला जाणे चुकीचे असून, नवीन नियमानुसार मोबदला दिला जावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.

सांबरकुंड धरण प्रकल्पासाठी तत्कालीन आमदार अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी प्रयत्न केले. परंतु, राज्य सरकारने नेहमीच कोकणाकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनीसुद्धा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले. तसेच माझ्या आमदारकीच काळात आठ वर्षांपूर्वी याबाबत लक्षवेधी मांडली होती, असे पाटील म्हणाले. आ. जयंत पाटील यांनी या धरणाचा प्रश्‍न सातत्याने लावून धरला आहे. परंतु, सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, आ. पंडित पाटील यांनी केला आहे. त्यावेळचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सचिव श्री. चेहेल यांनी या धरणाच्या कामाला तांत्रिक मंजुरी दिली. परंतु, जमिनीचे जे पैसे द्यायला हवे होते, त्यासाठी शासनाने दिरंगाई केली. मंत्रिमंडळात कोकणातील मंत्री असताना देखील, तसेच जिल्ह्याकडेसुद्धा जलसंपदा खाते असतानाही राज्य सरकार त्याला मंजुरी देत नाही. धरणाची मूळ किंमत कमी होती, पण आता जमिनीच्या किंमती वाढल्याने नवीन नियमाप्रमाणे तिप्पट जमिनीला दर द्यायला पाहिजे, त्यामुळे राज्य सरकारने जमिनीचा प्रश्‍न तात्काळ सोडवावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली. राज्यकर्ते इथे नवनवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला लागणार्‍या मूलभूत सुविधा देत नाहीत, असा आरोपही आ. पाटील यांनी केला.

चणेरा धरण प्रकल्प अपूर्ण आहे, सांबरकुंड धरण अपूर्ण आहे, याविषयी जनता दरबारात प्रश्‍न उपस्थित होणार आहे. जलसंपदा विभागाला केवळ आठ हजार कोटी रुपयांची तरतूद असते, आणि सातत्याने जलसंपदा मंत्री हे खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातील असल्याने कोकणावर अन्याय होत आहे, असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले. येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य भाव मिळायला हवा, अशी शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे, असे आ. पंडित पाटील यांनी स्पष्ट केले.

आठ वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने सांबरकुंड धरणाला मंजुरी दिली होती. मात्र, कामात होत असलेल्या चालढकलीमुळे अजूनही धरणाचे काम मार्गी लागलेले नाही. शासन काम काहीच न करता फक्त नौटंकी करत असल्याचा आरोपदेखील पंडित पाटील यांनी केला आहे. त्यावेळीच जर शासनाने पैसे दिले असते, तर तेव्हाच प्रकल्प मार्गी लागला असता, असेही ते म्हणाले.

पुन्हा 2020 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धरणाच्या सुधारित कामाला मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी देण्यात आलेली ही पाचवी सुधारित मंजुरी होती. यानंतर या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक कारणे आणि प्रकल्पग्रस्तांचे असहकार्य यामुळे भूसंपादनाचे काम मार्गी लागू शकलेले नाही.

अलिबाग तालुक्यातील जमीन सिंचनाखाली हा या धरणाच्या निर्मितीमागचा उद्देश होता. 28 सप्टेंबर 1982 साली प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी प्रकल्पाची मूळ किंमत 11 कोटी 71 लाख एवढी होती. प्रकल्पासाठी 275 हेक्टर जमिनीची आवश्यकता होती, तर जांभुळवाडी, सांबरकुंड वाडी आणि खैरवाडी या तीन गावांचे पुनर्वसन करावे लागणार होते. यासाठी राजवाडी येथील 28 हेक्टर जागा संपादित केली जाणार होती. त्यावेळी प्रकल्पामुळे 208 कुटुंबे बाधित होणार होती. ज्यात 1 हजार 027 लोकसंख्येचा समावेश होता.

पण नंतर निरनिराळ्या कारणांनी धरणाचे काम रखडत गेले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, संपादित जमिनीला वाढीव मोबदला यासारखे प्रश्‍न चिघळत राहिले. 40 वर्षांत पाच वेळा प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले. 11 कोटींचे धरणाचे काम आता 742 कोटींवर जाऊन पोहोचले आहे. अजूनही हे काम मार्गी लागेल की नाही याबाबत साशंकता कायम आहे.

आता नव्याने या प्रकल्पावर जलसंपदा विभागाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 6 मे 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सर्व परवानग्या आणि भूसंपादन वेळेत झाल्यास हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाने व्यक्त केली जात होती. मात्र, 2022 वर्ष सरायला आले तरी भूसंपादनाचा तिढाच सुटू शकलेला नाही. कोकणातील सिंचन प्रकल्पांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

आवश्यक जमीन
बुडीत क्षेत्र :- २२८.४० हेक्टर
कालव्यासाठी जमीन :- ४६.६० हेक्टर
सिंचनाचे लाभक्षेत्र :- २९२७ हेक्टर

मोबदला वाटप :- ३३ कोटी रु.

सुधारणा झालेल्या प्रशासकीय मान्यता
मूळ मान्यता :– ११.७१ कोटी (जुलै १९८२)
दुसरी सुधारित मान्यता :– २९.७१ कोटी (मार्च १९९५)
तिसरी मान्यता :– ५०.४० कोटी (ऑक्टोबर २००१)
चौथे अंदाजपत्रक :– ३३५.९२ कोटी (२०१२-१३)
पाचवी मान्यता :– ७४२ कोटी (६ मे २०२०)

धरणाच्या भूसंपादनासाठी आत्तापर्यंत एकूण ३७ कोटी १२ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यात बुडीत क्षेत्रात येणाऱ्या १०३ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी महसूल यंत्रणेस देण्यात आलेल्या ४.१२ कोटी रुपयांचा, तर भूसंपादन कायदा २०१३ नुसार भूसंपादनास तयारी दर्शविलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ३३ कोटी रुपयांचा समावेश आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspandit patilPandit Shethraigadsabarkund damskpskp alibagskp news
Previous Post

आदिवासी बांधव आनंदाच्या शिधा कीटच्या प्रतिक्षेत

Next Post

शेतीची कामे खोळंबल्यामुळे मेंढपाळचा निवार्‍याचा प्रश्‍न

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

पेण भाजपमध्ये उभी फूट

December 29, 2025
जप्त कंटेनर अनेक वर्षांपासून धूळखात
उरण

जप्त कंटेनर अनेक वर्षांपासून धूळखात

December 29, 2025
शेकापच्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल
sliderhome

शेकापच्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल

December 29, 2025
रोजगार मंत्र्याचा विकास अडचणीत
sliderhome

रोजगार मंत्र्याचा विकास अडचणीत

December 29, 2025
टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग
sliderhome

टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग

December 29, 2025
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

December 29, 2025
Next Post
शेतीची कामे खोळंबल्यामुळे  मेंढपाळचा निवार्‍याचा प्रश्‍न

शेतीची कामे खोळंबल्यामुळे मेंढपाळचा निवार्‍याचा प्रश्‍न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?