नागोठणे | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती व सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नागोठणे शहरातील शुद्ध पाण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. शुद्ध पाणी योजनेवर सुमारे 8 कोटी रुपये खर्च होऊनही ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित न झाल्याने याप्रकरणी लक्ष घालून नागोठणेकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी विनंती भाजपचे नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, हे निवेदन सचिन मोदी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व आ. प्रवीण दरेकर यांना दिले.