। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळते. रेवदंडा समुद्र किनारी ठाणे, मुंबई, पुणे आदी शहरातून पर्यटक येथे येतात. या वाढत्या पर्यटकांना खाद्य पदार्थाची सुविधा मिळण्यासाठी रेवदंडा येथील महिलांनी शेकापच्या महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रेरणेने व सहकार्याने श्री समर्थ कृपा स्टॉलची उभारणी केली. या महिलांना शेकापक्ष पुरोगामी युवक अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांचे मार्गदर्शन लाभले. तर स्टॉल उभारणीत अॅड.रोहित भोईर यांनी मदत केली. महिलांनी उभारलेल्या श्री समर्थ कृपा स्टॉलचा नुकताच शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शेकापक्ष पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे यांच्यासह रेवदंड्यातील सामाजिक कार्यकर्ते सलिम तांडेल, शरद गोंधळी, श्रीकांत भोईर, अॅड. प्रियांका पिटनाईक, सुरेश पिटनाईक, राजू भोईर, रोशन भोईर तसेच अॅड.रोहित भोईर आदीची उपस्थिती होती. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सलिम तांडेल यांचे हस्ते पुजाविधी व श्रीफळ वाढविण्यात आला. त्यानंतर विक्रांत वार्डे यांचे हस्ते फित कापून महिलांचे श्री समर्थ स्टॉलचा शुभारंभ केला.