। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आधीच इंधन दरवाढीने नागरिक हैराण झालेले असताना आता खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडलंय. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती या देशातील खाद्य तेलाच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचं भारतीय उद्योग मंडळाने सांगितले आहे.दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादन कमी झाले होते तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. त्यात मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने आता आयातीवरील कर कमी केले तरच तेलाचे भाव कमी होतील.