। पाताळगंगा । वार्ताहर ।
सावरोली-खारपाडा या रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत अपघाताला निमंत्रण देत आहे. मात्र, पावसाळा जवळजवळ संपत आला असूनही रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या गवताची छाटणी झाली नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यातील असलेल्या बहुतेक रस्त्यांवर वाढलेले गवत मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी वाढलेले गवत सात ते आठ फुट वाढले असल्यामुळे समोरील येणार्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत आहे. मात्र, अ से असले तरीसुद्धा अपघात झाल्यावर संबंधित या रस्त्याच्या अधिकार्यांना जाग येईल का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
तालुक्यातील काही रस्त्यांची तर दुरवस्था आहेच, मात्र वाढलेले गवत त्यामध्ये अणखीन भर पडत आहे. काही वळणांवर गवत खूप वाढले असून, रस्त्याच्या बाजूला झुकलेले पहावयास मिळत आहे. हे गवत अपघाताला निमंत्रण देत आहे.