। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यूएसए आणि वेस्ट इंडिजमधील टी-20 विश्वचषक 2024 भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी अखेरचे ठरण्याची दाट शक्यता आहे. टी-20 विश्वचषकासाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, विराट कोहली आपली महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. असे असले तरी वर्ल्डकपनंतर दोन्ही स्टार खेळाडू टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आपली अंतिम कामगिरी दाखवतील. आयसीसीची ट्रॉफी जरी मिळाली तरी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दोन्ही खेळाडू रामराम ठोकतील. त्यामुळे देशभरातील त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी निराशेची बाब आहे, असंच म्हणावं लागेल.