संप्रदायामुळे जीवनातील अंधकार दूर होतो- खा.श्रीरंग बारणे

| रसायनी | वार्ताहर |

परमार्थ आणि वारकरी संप्रदाय यामुळे जीवनातील अंधकार दूर होतो आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन सामाजिक कार्य करणारे उमेश गायकवाड असे तरुण निर्माण होऊन गाव, समाज आणि देश उभारणीस चालना देतात. त्यांच्या सामाजिक कार्याला लागणारी मदत करण्यास आम्ही बांधिल आहोत, अशी भावना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.

उमेश अशोक गायकवाड यांनी कुंभिवली ग्रामस्थ, वारकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने खा.श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे व खालापूर तालुक्यातील कीर्तनकार व प्रवचनकार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य संदिप यादव, संजय बारस्कार, काशिनाथ पारठे, किशोर बैलमारे, किशोर पाटील, संजय परणेकर, निलेश पिंगळे, परेश गायकवाड, प्रवीण म्हामुणकर, सिद्देश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, रवींद्र पोळेकर, दीपक मोरे, सतीश गायकवाड, प्रणय गायकवाड, विश्वास कालेकर, ग्रामस्थ मंडळ कुंभीवली व परिसर यांचे लाभले.

Exit mobile version