ही पापाची नाही तर बापाची आघाडी

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर वाग्बाण सोडले. त्यांनी दोघांवर तुफान हल्लाबोल चढवला. अखेरच्या टप्प्यातही आरोपांची राळ उठली आहे. तर शब्दांना धार चढली आहे. नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकविल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, हे चोर लोकं आहेत, ज्यांनी पार्टीवरती डाका टाकला. यांनी मान्य केले की चोरी केली आहे. हे कसे लोक आहेत जे पार्टी चोरी करतात आणि वरून बोलतात, असा चिमटा राऊतांनी काढला. चोराला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे लोक चोरांचे साथीदार असल्याचा आरोप त्यांनी केला. हेच लोक चोरांचे सरदार आहेत. त्यामुळे आम्हाला देशात परिवर्तन आणायचा आणि देशाचे संविधानाचा बचाव करायचा आहे. 4 जून नंतर या देशात भाजपाचे अस्तित्व राहणार की नाही, हा मोठा प्रश्‍न आहे. परंतु, विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला सन्मानाचे पद मिळावे ही अपेक्षा आहे. ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहेत. त्यासुद्धा नरेंद्र मोदींना विरोध करत आहेत जे काय होईल ते सोबत होईल. ही पापाची आघाडीने नाही तर यांच्या बापाची आघाडी आहे येणार्‍या काळात हे त्यांना कळेल.

Exit mobile version