वणवा लागल्यामुळे पर्यावरणाचा र्हास
। पाताळगंगा । वार्ताहर ।
भात शेतीची कामे पूर्ण झाल्यावर वणवा लावण्याची नागरिकांची विचित्र पद्धत असते. या वणवामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून त्याचबरोबर वनसंपत्ती नष्ट होत आहे.
पावसाला संपला की जमिनीवरील पाणी निघून जाते. त्यामुळे तिथे असलेले गवत सुकते. हे सुके गवत शेतकर्यांच्या गुरांसाठी अत्यंत महत्वाचे असते. परंतू वणवा लावल्याने तिथे असलेले गवत पूर्णपणे जळून जाते. त्यामुळे शेतकर्यांच्या गुरांसाठी जंगलातील चारा मिळणे कठीण होत चालले आहे. हा वणवा लागल्याने तिथे असलेल्या जंगली प्राणी, पक्षी त्यांची घरटी, रानातील आयुर्वेदिक वनस्पती या वणवामुळे जळून खाक होत असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. तसेच वणवा लावण्याविरोधात वनविभागाची शासकीय यंत्रणेने गावपातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच लोकांना पर्यावरणाचे महत्व पटून देणे गरजेचे आहे. वणवा लावणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत.