| मुंबई | वार्ताहर |
महानगरपालिकेच्या चेंबूर येथील शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील आणिक गांव पालिका शाळेच्या इयत्ता सहावी आणि सातवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मध्यान्ह भोजन देण्यात आले.
जेवण केल्यावर विद्यार्थ्यांना 11.30 उलटी, मळमळ, पोटात दुखू लागले. याबाबत त्यांनी शिक्षक व कर्मचारी यांना सांगितले.ही परिस्थिती पाहून शाळेतील शिक्षकानी विद्यार्थ्याना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले..एकूण 16 विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचार घेणारे विद्यार्थी एकूण 12 ते 13 वर्षे वयोगटातील आहे. अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या जेवणाचे नमुने जमा केले असून ते दादर येथील पालिकाप्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी हे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकारी व पालिका अधिकारी यांनी सांगितले आहे.