भाग्यश्री बागड यांच्या कवितेची निवड

। श्रीगाव । वार्ताहर ।
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन भुजबळ नॉलेज सिटी,आडगाव (नाशिक) येथे होणार असून कविकट्टा यामधे सावली प्रकाशन समूह(अलिबाग)च्या सदस्या कवयित्री सौ.भाग्यश्री राकेश बागड यांच्या शब्द सरी बरसल्या या कविते निवड झाली आहे. सदर कविता दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या सत्रात सादरीकरण होईल असे सम्मेलन समितीने कळवले आहे. कवयित्री भाग्यश्री बागड या सावली प्रकाशन समूहासह इतर अनेक ऑनलाइन समूहात दैनंदिन कविता,चारोळी, अभंग लेखन करत असतात त्यांना आजपर्यंत अनेक सर्वोत्कृष्ट ते लक्षवेधी पर्यंत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्या अनेक साहित्य संस्थाच्या कार्यकारणीवर कार्य करत आहेत त्यांच्या कवितेची निवड झाल्याबद्दल त्यांचे सावली प्रकाशन समूह संस्थापक सचिन पाटील यांच्यासह सर्व साहित्यीकांनी अभिनंदन करून पुढील साहित्य क्षेत्रासाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version