शेकाप – काँग्रेस आघाडीचे आनंद बुरांडे आक्षीचे उपसरपंच

। आक्षी । प्रतिनिधी ।
आक्षी, ता. अलिबाग ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकाप,काँग्रेस आघाडीचे आनंद बुराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी (दि.2) उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी थेट सरपंचपदी निवडून आलेल्या रश्मी रवींद्र पाटील यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.उपसरपंचपदासाठी बुरांडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यावेळी माजी सरपंच नंदकुमार भाऊ वाळंज, माजी जि.प. सदस्य द्वारकानाथ नाईक, काँग्रेस नेते प्रभाकर राणे आदींसह ग्रामसेवक, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आक्षीच्या विकासासाठी माजी सरपंच नंदकुमार वाळंज यांचे मोठे योगदान लाभले आहे. त्यांच्या कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्रभर आक्षी ग्रामपंचायतीचे नाव लौकिकास आणले. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन काम करावे. तसेच शेकाप आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, सुप्रिया पाटील, माजी आ. पंडित पाटील,जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी वेळोवेळी आक्षी गावासाठी मदतीचा हात पुढे केला आहे आणि ह्या पुढेही करतील हा विश्‍वास आहे. –
द्वारकानाथ नाईक- शेकाप नेते

Exit mobile version