। मुंबई । प्रतिनिधी ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा फोन केला. एकनाथ शिंदे यांना दोनतृतीयांशपेक्षा जास्त म्हणजेच 37 आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु त्यानंतरही विधानसभेत वेगळ्या त्यांना वेगळ्या पक्षाची मान्यता मिळणे सोपे नाही. बंडखोर गटाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी या समस्येवर तोडगा काढायचा असेल, तर त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला एखाद्या पक्षात विलीन करणे आहे. यामुळे शिंदे गट मनसेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
शिंदे यांनी का केला फोन
एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा राज ठाकरे यांच्यांशी चर्चा केली. यावेळी मनसेत सामील होण्याची ऑफर एकनाथ शिंदे यांनी दिली. याला मनसेचे अनेक नेते अनुकूल आहे. राजकारणात कोणत्याही शक्यतेला अंत नसतो. दोन्ही बाजूच्या लोकांची विचारसरणी सारखीच आहे. त्यामुळे ते एकत्र आले तर महाराष्ट्रातील जनतेचे भले होईल, असेही मनसे नेते म्हणाले. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये केवळ चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी फोन केल्याचे मनसेकडून म्हटले जात आहे.
मनसे का आहे पर्याय
राजकीय तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, उपसभापती नरहरी झिरवाल यांनी अपात्र घोषित केलेल्या १६ आमदारांना वाचवण्यासाठी शिंदे गटाला लवकरात लवकर विद्यमान राजकीय पक्षात विलीन व्हायचे आहे. विधानसभेत मनसेचा एकच आमदार असला तरी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची स्थापना झाली आहे. अशा स्थितीत इतर कोणत्याही पक्षात विलीन होण्याऐवजी शिंदे गटासाठी मनसे हाच पक्ष सर्वात योग्य ठरेल