| माणगाव | वार्ताहर |
मुंंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर पडले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने मराठी माणूस खवळला असून, हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान असल्याच्या प्रतिक्रिया राज्यात सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, रविवार, दि.31 जुलै रोजी माणगाव बसस्थानकासमोर मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करीत राज्यपालांचा निषेध केला.
या निषेध आंदोलनात माणगाव तालुका शिवसेनाप्रमुख गजानन अधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. संतोष कामेरकर, सुधीर सोनावणे, दिलीप घोणे, विपुल उभारे, अजित तार्लेकर, अनिल सोनार, अजिंकेश जाधव, विश्वंभर दांडेकर, बबन काजारे, संतोष वारगे, योगेश बक्कम, चंद्रकांत यादव, संतोष कळंबे आदींसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.