आंबेवाडी नाक्यावर गटाराची दुर्गंधी

। गोवे-कोलाड। वार्ताहर।
आंबेवाडी नाका येथील गटारालाईंचे काम गेल्या वर्षी सुरु केले होते. परंतु एक वर्षे पूर्म होऊन गेले तरी या गटारलाईनचे अर्धवट स्थितीत असून येथील जागोजागी खोदून ठेवलेल्या गटारांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आंबेवाडी व वरसगाव नाका या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला गेल्या वर्षी गटार लाईनचे काम सुरु होते.ते पावसाळ्यापूर्वी पुर्ण होईल असे मुंबई-गोवा हायवे वरील काम करणार्‍या ठेकेदारांनी सांगितले.पण हे काम पावसाळा संपला तरी अर्धवट स्थितीत आहे.काही ठिकाणी गटारलाईन पुर्ण झाले आहे. अशा ठिकाणी गटारावर बसवलेले झाकण एवढे निस्कृष्ठ दर्जाचे आहे.कि एका महिन्यात ते तुटून खाली गेले आहे.
शिवनेरी मंगल कार्यालय जवळ असणार्‍या पोस्ट ऑफिस जवळ तर एक मोठा खड्डा खोदून ठेवला आहे.यामुळे या बाजूला जाणार्‍या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तर आंबेवाडी नाका येथील प्रभु एजन्सीजवळ या खोदून ठेवलेल्या गटारात एक छोटा मुलगा पडून गंभीर जखमी झाला होता.तसेच अर्धवट कामामुळे काही ठिकाणी गटार मोकळा ठेवल्यामुळे या गटारात घाण,व असंख्य बाटल्या टाकल्या असून त्या कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसलेली आहे.

Exit mobile version