सोशल मिडिया पद आवश्यक -चित्रलेखा पाटील

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12 कोटी आहे. त्यातील 50 टक्के नागरिक सोशल मिडियासोबत जोडलेला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष संघटनाच्यादृष्टीने शेतकरी कामगार पक्षाचे सोशल मिडिया हे पद निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी या बैठकीत केली. गावपातळीपासून संपूर्ण महाराष्ट्रात हे पद निर्माण केले पाहिजे. आजच नाही तर गेली अनेक वर्षे शेकाप जे समाजकारण करीत आहे, तितकं काम अन्य कोणताही पक्ष करीत नाही. मात्र तरीही शेकाप कुठेही दिसत नाही. त्यामुळे 12 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचायचे असेल तर सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम असल्याचेही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थितांच्या नजरेत आणून दिले.

Exit mobile version