| रायपूर | वृत्तसंस्था |
गेल्या दोन दशकांपासून भारतीय राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी राजकरणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्तीसगड येथील रायपूर येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी संकेत दिले. आपला राजकीय प्रवास भारत जोडो यात्रेसोबत थांबू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या राजकरणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
रायपूर येथील अधिवेशनात पक्षातील नेते आणि संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, 2004 आणि 2009 मधील आपला विजय तसेच डॉ. मनमोहन सिंह यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. मात्र सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेसोबत माझा प्रवास ही थांबू शकतो. काँग्रेससाठी ही यात्रा महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. भारतातील जनतेला शांती, सहिष्णुता आणि हवी आहे, हे सिद्ध झालं आहे.
केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप आणि आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून उद्ध्वस्त केली आहे. यांनी काही व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप द्वेष पसरवत आहे आणि अल्पसंख्याक, महिला, दलित आदिवासींना लक्ष्य करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपच्या सत्तेला आपण खंबीरपणे सामोरे जावे. लोकांपर्यंत जाऊन आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवा, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.