| कोलकाता । वृत्तसंस्था ।
देशातील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट घोंगावू लागले असून स्पर्धा सूरू होण्यास 10 दिवस असतानाच बंगालच्या रणजी संघातील सात सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रणजी करंडक स्पर्धा 13 जानेवारीपासून सुरू होत आहे. अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता बंगालने 21 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बंगालचे क्रीडा मंत्री व भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारी याची या संघात निवड केली आहे. त्यांना याच वर्षी तृणमुल काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला होता. 36 वर्षीय मनोजने भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. रणजी करंडक स्पधे्रत बंगालला ब गटात स्थान मिळाले आहे आणि त्यांच्यासमोर विदर्भ, राजस्थान, केरळा, हरियाणा व त्रिपुरा यांचे आव्हान आहे.