परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

। मुंबई । वृत्तसंस्था ।
बारावीची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच परीक्षेच्या तणावातून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनी मालाडच्या खारोडी इनसवाडी येथील रहिवासी होती. बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. पण, अभ्यास होत नसल्यानं दिव्या मानसिक तणावात होती. याच नैराश्यातून तिनं मालाडच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांनी तिच्या खोलीत जाऊन बघितले असता दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर घरच्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचानामा केला असून मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version