आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चरी शेतकरी संपाचा 89 वा वर्धापन दिन सोहळा रविवार (दि. 27) शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील व चरी सरपंच निलम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
देशातला खोतीच्या विरोधातील शेतकर्यांचा पहिला संप हा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील चरी या गावात झाला. 27 ऑक्टोंबर 1933 मध्ये सुरू झालेला हा संप तब्बल सात वर्षे चालला होता. पुढील सात वर्षे शेतजमीन बांधबंदिस्त करण्यात आली, असा हा चरीचा शेतकरी संप 14 वर्ष चालला होता. याच शेतकरी संपामुळे कूळ कायदा लागू झाला. नारायण नागू पाटील यांनी संपाचे नेतृत्व करुन शेतकर्यांची खोतीविरोधात मोट बांधली होती. या संपाचा 89 वा वर्धापन दिन सोहळा रविवार पार पडणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जि.प.चे माजी सदस्य अॅड. आस्वाद पाटील, भावना पाटील, चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी उपसभापती मीनल माळी, माजी पं.स. सदस्य सुधीर थळे, समाज कल्याण अधिकारी प्रमोद जाधव, प्रकाश पाटील, पोयनाड पोलीस ठाण्याचे सपोनि नरेंद्र बेलदार, सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचाय चरी, प्राथमिक शाळा चरी, ग्रामस्थ मंडळ चरी, कोपरपाडा, कोपर यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे.