मिताली राजचा दावा
| क्वीन्सटाऊन | वृत्तसंस्था |
भारताने न्यूझीलंड विरूद्धचा पाचवा वनडे सामना जिंकून मालिकेची सांगता केली. भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. विजयात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने नाबाद 53 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. सामना संपल्यानंतर मिताली राजने 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणार्या वनडे वर्ल्डकप संदर्भात एक वक्तव्य केले. ती म्हणाली की मी ज्यावेळी वर्ल्डकप नंतर निवृत्त होईन त्यावेळी भारतीय संघात नवीन प्रतिभाशाली खेळाडू येतील आणि तो आणखी मजबूत होईल. मिताली राज म्हणाली, ममी ज्यावेळी या स्पर्धेनंतर निवृत्त होईन त्यावेळी भारतीय संघ येणार्या नव्या प्रतिभाशाली खेळाडूंमुळे चांगलाच मजबूत होईल.फ मिताली पुढे म्हणाते, मगेल्या काही सामन्यात आम्ही आमचा खेळ उंचावला आहे. वर्ल्डकपपूर्वीचा हा चांगला संकेत आहे. मोठ्या स्पर्धेपूर्वी तुमची चांगली तयारी होणे गरजेचे असते. आम्हाला भारतात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सराव करायची संधी मिळाली नाही.
पाचव्या सामन्याबाबत बोलताना मिताली म्हणाली, मखेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. मात्र आज आम्ही चांगली गोलंदाजी केली. मात्र अजून आम्हाला आमच्या फिल्डिंगवर जास्त काम करायला हवे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या या संधीसाठी त्यांचे आभार.फ पाचव्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडचे 251 धावांचे आव्हान 46 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने 71, हरमनप्रीत कौरने 63 तर कर्णधार मिताली राजने नाबाद 53 धावांची खेळी केली.