। पुणे । प्रतिनिधी ।
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. बोर्डाकडून बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला असून व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये बाकीच्या पेपरच्या नियोजनात कोणताही बदल झालेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.