हत्येच्या निषेधार्थ तहसीलदार पत्र

| पनवेल । वार्ताहर ।
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय मराठी परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांच्या आव्हानानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तहसीलदार विजय तळेकर यांना पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या आणि राज्यातील पत्रकारांवर होणार्‍या हल्याच्या निषेधाचे पत्र दिले तसेच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. यावेळी माधव पाटील, सुनील पोतदार, निलेश सोनावणे, अनिल भोळे, मंदार दोंदे, संजय कदम, भालचंद्र जुमलेदार, सय्यद राजेश डांगळे, अनिल कुरघुडे, रवी गायकवाड, अमित, राजू गाडे, गणपत वारगडा, शंकर वायदंडे, वसीम पटेल उपस्थित होते.

Exit mobile version