तो मृतदेह अंबरनाथ येथील तरुणाचा

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ पोलीस ठाण्याचे हद्दीत असलेल्या पाली भुतीवली धरणाच्या जलाशयात सापडलेला तो मृतदेह अंबरनाथ येथील तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे गुढ अद्याप उकलले नाही. अनिकेत शैलेंद्र पांडे (वय 21) अंबरनाथ पश्चिम असे त्याचे नाव आहे. 2 ऑगस्टला गुरुनानक कॉलेज, सायन मुंबई येथे बीएससी आयटीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचे निकालपत्र आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शोध लागला नसल्याने शेवटी अंबरनाथ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली पाली भुतीवली धरण परिसरात अशा वर्णनाची व्यक्ती सापडली असल्याची माहिती मिळताच अंबरनाथ येथून त्यांचे नातेवाईक नेरळ येथे पोहचले आणि शेवटी सापडलेल्या मृतदेहाचा शोध लागला.

मात्र महाविद्यालयात निकाल आणण्यासाठी निघालेला तरुण नेरळ भिवपुरी रोड जवळील पाली भुतीवली धरणाच्या परिसरात आला कसा?त्याच्या सोबत अन्य कोणी होते काय?सोबत असणारे यांनी घातपात घडवून आणला काय? तसेच धरणावर येण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न नेरळ पोलिसांसमोर आहेत.

Exit mobile version