। पेण । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी पेण तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कोतवाल, सरपंच व उपसरपंच यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिराचे नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजन केले होते.
कार्यक्रमास अध्यक्षपदी नायब तहसीलदार सुरेश थळे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील डॉ. सिद्धार्थ पाटील, किरण बाथरूम, अॅड. गोपाळ शेळके, डॉ. अजित बर्गे, अमिता घरत, अमिषा घरत या उपस्थित होत्या. तलाठी ग्रामसेवक कोतवाल मंडळ अधिकारी आणि सरपंच उपसरपंच हे कायम जनतेची सेवा करतात अशावेळी आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपल्यावरच आपत्ती येऊ शकते असे पाटील यांनी सांगून आपले घर घरातील विजेच्या वस्तू वाहने अपघात साप व विंचू दंश याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले.
यामध्ये अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक दाखवितात विसाव्या मिनिटात डॉ. अजित बर्गे हे 108 रुग्णवाहिका सहित हजर झाले तर आग लागल्यास वर पहिल्या माळ्यावरील ज्येष्ठ नागरिकांना खाली कसे आणावे हे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचबरोबर आपत्ती कायदा 2015 ची माहिती दिली महिलांवर लग्नानंतर येणार्या आपत्तीसाठी कौटुंबिक कायद्याची माहिती अॅड. गोपाळ शेळके दिली. स्वच्छता व आरोग्य बाबतच्या आपत्तीवर डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी माहिती दिली. तरुणींना नोकरी करणार्या वर आपत्ती येऊ नये म्हणून ब्लॅक बेल्ट धारक घरत भगिनींनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
नायब तहसीलदार सुरेश थळे यांनी सांगितले की, पावसाळा जवळ घेऊ लागला आहे आणि कधी किंवा नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगता येत नाही, यासाठी महसूलचे प्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत असणार्याना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक पाटील व त्यांच्या सहकार्यांनी दिली आहे. यावेळी कोव्हिड काळात उत्कृष्ट कार्य करणार्या खारपाडा ग्रामपंचायतच्या रश्मी भगत यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील 90 जण तलाठी कोतवाल ग्रामसेवक मंडळ अधिकारी सरपंच उपसरपंच उपस्थित होते







