पीडितांचा खटला जलदगती न्यायालयात न्यावा

। पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे अणि उरणमधील यशश्री शिंदे यांच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. ह्या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणार्‍या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणार्‍या आहेत. ह्या दोन्हीं घटनेतील आरोपींनी अमानवी कृत्य केले असून अत्यंत निर्घृणपणें अत्याचार करत अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे ह्यांची हत्या केली आहे. ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी अणि कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने कामोठे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील कायदा अणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी शासनस्तरावर कठोर पावले उचलावीत जेणेकरून अशा अमानवी निर्घृण कृत्यांना प्रतिबंध करता येईल. तसेच अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे ह्यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता अणि यशश्रीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदेंच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी कॉलनी फोरम अध्यक्षा लीना गरड, मंगेश अढाव, महिला अध्यक्षा जयश्री झा, सामजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर, सचिव बापू साळुंखे,आम आदमी पक्षाचे चिमाजी शिंदे, कॉलनी फोरमचे पदाधिकारी संदिप इथापे, देवानंद बाठे, सचिन खरात, संदिप लबदे, पंकज पोदुतवार, सुनील आडे,, मिलिंद बलखंडे, अजित चौकेकर, तुषार दळवी, अमित घुटुकडे गीता कुडाळकर, अर्पिता वाणी, श्‍वेतल भुसारी , उषाकिरण शिंगे, संजीवनी तोत्रे, प्रियांका साठ्ये, अपर्णा गावडे, हरिष बाब्रिया, अजित चौकेकर, अशोक मनवर, ह्यांच्यासह कामोठे शहरातली नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version