पनवेल तालुक्यातील धांनसर गावांमध्ये आज ही पळाली जात आहे प्रथा
| पनवेल | दीपक घरत |
बळीप्रतिपदेच्या दिवशी गुर ढोरांना अंघोळ घालून सजवण्याची व गावाच्या वेशीवर गवताच्या गंजिना आग लावून त्या वरून उडवण्याची प्रथा तालुक्यातील धांनसर गावात आजही पाळली जात आहे.
बुधवारी (ता.26) देखील गावातील नागरिकांनी आपल्या घरातील गुरांना सजवून या प्रथेच पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे. तालुक्याचे शहरी करण होण्या पूर्वी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात होती व त्या करिता जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैल जोडी सोबत गाई म्हशी पाळण्याची पद्धत असल्याने दिवाळी दरम्यान येणाऱ्या बलिप्रतिपदा या दिवशी पहाटे लवकर उठून घरातील गुरु धोरांना अंघोळ घालून सजवण्याची व गावाच्या वेशीवर गवताच्या गंजिना आग लावून त्या वरून गुरु उडवण्याची प्रथा पाळली जात होती.
![](https://krushival.in/grygrars/2022/10/image_editor_output_image285118634-16667863201763833240854092251111-300x300.jpg)
विशेषतः ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील गावात साजरी करण्यात येणारी ही प्रथा अनेकांनी शेतीची काम कायमची बंद करून गुर पाळणे बंद केल्याने कमी झाली असली तरी तालुक्यातील काही गावात आज देखील काही प्रमाणात ही प्रथा पाळण्यात येत असून पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील धांनसर गावातील काही व्यक्तींनी देखील ही परंपरा अद्याप देखील जिवंत ठेवली आहे.
मागील काही वर्षात प्राणी मित्रांकडून या प्रथे वर टीका केली जात आहे. या प्रथे मुळे गुरांना इजा होण्याची शक्यता असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे असले तरी ही प्रथा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. दर वर्षी भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावच्या वेशीवर आग लावून त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. या साठी बळी प्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून बैलांची स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना तासून रंग किंवा तेल लावून चमकावले जाते. बैलांच्या शिंगांना फुगे बांधून, त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. त्यांच्या अंगावर झालर वगैरे टाकून छानपैकी सजवले जाते. सजवलेल्या बैलांना पंचारतीने औक्षण घातले जाते. घरातील स्त्रिया त्यांना पूजतात व दिवाळीत केलेलं गोड धोड भरवतात. मग गावातल्या चावडीवर मोठा जाळ पेटवला जाऊन एखाद्या मिरवणुकी प्रमाणे सगळे बैल एका मागोमाग या जाळावरून उडवले जातात.
![](https://krushival.in/grygrars/2022/10/image_editor_output_image-1067653468-16667864058024201229697821726961-225x300.jpg)
या प्रथेमागे सांगितल्या जाणाऱ्या शास्त्रीय कारणानुसार भातशेतीची चिखलणी व लावणी झाल्यावर पावसाळ्यातील दोन अडीच महिने बैलांना काही काम नसते. बैल हिरवे गार गवत खाऊन घरातल्या गोठ्यांमध्ये असतात, त्यामुळे त्यांच्या पायांना सतत ओलाव्यामुळे जखमा व रोग राई होते. काम नसल्याने काहीशा सुस्तावलेल्या बैलांना बळी प्रतिपदेला धूर व आगीवरुन उडवले जाण्यामुळे त्यांच्या अंगावर पायांवर असलेले रोग व जीवजंतू नष्ट होतात तसेच धूर व आग यांच्याशी संपर्क आल्याने बैलांच्या मनात आग व धुरा बद्दल असलेली भीती निघून जाते.
दिवाळी संपली की लगेच शेतीची मशागत करण्यासाठी बैलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण होते. या वेळी प्रत्येक शेतकरी देखील बैलांच्या पुढे जाऊन स्वतः धुरात आणि आगीवरून जातो आणि त्याच्या मागे आपल्या बैलांना ओढत नेतो. दर वर्षी शेतात राब राब राबणाऱ्या बैलांची ईडा पिडा टाळण्यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली ढोरं उडवण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गांवर असली तरी काही गावात आज देखील ही प्रथा उत्साहात साजरी केली जात