स्थानिकांचे हाल…कृषीवलच्या प्रतिनिधींने दिला आधार..पहा व्हिडिओ

। महाड/ तळीये । प्रतिनिधी ।
महाड दुर्घटनेनंतर रहायचे कुठे, जायचे कुठे, आपलं कोण वाचलंय, शोधायचं कुठे, अशा अवस्थेत सापडलेल्या ग्रामस्थांचे हाल पाहून दगडालाही पाझर फुटेल. ग्रामस्थांचे प्रश्‍न, त्यांच्या मनात सुरु असलेली घालमेल, मदतीची प्रतीक्षा…हे सारे काही जाणून घेण्यासाठी कृषीवलचे प्रतिनिधी भारत रांजणकर यांनी थेट तळीये ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटून आधार देण्याचा प्रयत्न केला. तसेच कृषीवल कायमच पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याना मदत करेल, असा विश्‍वासही पिडितांना दिला. सध्या तळीयेतील वाचलेल्या ग्रामस्थांवी अवस्था बिकट आहे. त्यांना मदतीची गरज आहे. म्हणूनच सारेकाही विसरुन आपल्या माणसांना आधार देऊया. त्यासाठी आपण सार्‍यांनीच एकत्र येण्याची गरज आहे.

Exit mobile version