। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागांचे नुकसान झाले. त्यामध्ये अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या निवारा शेडचे कापड वार्यामुळे उडून, फाटले गेले आहे.
अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. किनार्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. अलिबागमध्ये वर्षाला दोन लाखाहून अधिक पर्यटक येतात. मुंबई, ठाणे, पुणे अशा अनेक जिल्ह्यांसह वेगवेगळ्या राज्यातील देशातील पर्यटक अलिबागला पसंती देतात.अलिबाग समुद्रकिनारी सकाळ व संध्याकाळी फिरण्यास येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने पर्यटकांच्या सोयीसाठी किनारी निवारा शेडची निर्मिती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून या निवाराशेडचा फायदा पर्यटकांना उन्हाळ्यासह पावसाळ्यातदेखील होत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून डोंगरभागासह किनारीपट्टयावर पावसाने धुमाकूळ घातला आहे. या वादळी पावसात अलिबाग समुद्रकिनार्यावरील निवारा शेडचा कापड उडला. काही भाग फाटूनही गेला. त्यामुळे पर्यटकांचा आधार गेल्याचे चित्र दिसून आले आहे.
निवारा शेडवर बसविण्यात आलेला कापड वादळी पावसामुळे फाटून उडाला आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी नव्याने कापड बसविले जाणार आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. वारा पाऊस आहे. वारा पाऊस कमी झाल्यावर लवकर निवारा शेडवर कापड लावण्याचे काम केले जाईल.
अंगाई साळुंखे
प्रशासक तथा मुख्याधिकारी, अलिबाग