शिहूतील घटना
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
शिहु विभागात देखील दोन दिवस प्रचंड वादळवारा व विजांचा कडकडाट सुरू आहे, यावेळी वीज अंगावर पडून शिहू येथील एका शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी( दि. 3) रोजी घडली. दिलीप बाळाराम पाटील ( वय 48 ) हे आपल्या शेतावरून घरी येत असताना वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.
वीज अंगावर पडून शेतकरी दगावला
![](https://krushival.in/grygrars/2021/08/death.jpg)