ठाकरे सरकारने घेतलेले अखेरचे निर्णय अवैध

। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली होती. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासही मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती. मात्र, हे निर्णय अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राज्यपालांनी विश्‍वासदर्शक ठरावाचे पत्र पाठवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते. तरीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेऊन निर्णय घेतले. त्यामुळे हे निर्णय अवैध ठरले आहेत. आता हे निर्णय पुन्हा नव्याने घ्यावे लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लवकरच आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार. – देवेंद्र फडणवीस, भाजप नेते

Exit mobile version