भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना: ओव्हलवर 7 जूनला रंगणार


। मुंबई । वृत्तसंस्था ।
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या आवृत्तीचा लीग टप्पा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसह संपला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

इंग्लंडमधील ओव्हलवर 7 जूनपासून दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची लढत रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने 66.67 टक्के गुणांसह प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 58.8 टक्के गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.भारत सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. मागील आवृत्तीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून प्रथमच डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शेवटची संधी होती, परंतु संघाने मालिका 0-2 ने गमावली, त्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पराभवामुळे श्रीलंकेला बक्षीस रकमेतही मोठा फटका बसला आहे.खरेतर, मालिकेपूर्वी श्रीलंका डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसर्या स्थानावर होता, परंतु न्यूझीलंडकडून क्लीन मिळाल्यानंतर ते पाचव्या स्थानावर घसरले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड पॉइंट टेबलमध्ये तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना, आयसीसीने अद्याप या आवृत्तीसाठी बक्षीस रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र मागील आवृत्तीच्या आधारेच संघांना बक्षीस रक्कम दिली जाणे अपेक्षित आहे.जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघाला मागील आवृत्तीत टेस्ट मेससह 11.72 कोटी रुपये (1.6 दशलक्ष) बक्षीस रक्कम देण्यात आली होती, तर पराभूत संघाला 5.86 कोटी रुपये (8 दशलक्ष) मिळाले होते.

Exit mobile version