मविआला धक्का नाही -अजितदादा

| बारामती | प्रतिनिधी |

शरद पवार यांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. तर महाविकास आघाडीला कुठलाही धक्का लागणार नाही, आम्ही एकत्र होतो एकत्र असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर केले.

बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताने ते म्हणाले की, शरद पवार साहेब तुमच्याशी बोलले. त्यांनी जे सांगायचं आहे ते सांगितलं. जे साहेबांचं मत आहे तेच आमचं मत आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे तो सर्वाना सांगितलं आहे. त्यांच्या निर्णयाने सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. साहेबांनी कार्यकर्त्यांच्या, पक्षातीन नेत्यांच्या आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. आता आम्ही पुन्हा कामाला लागलो असल्याचेही अजितदादा म्हणाले.

Exit mobile version