प्यू रिसर्चचे सर्वेक्षण
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात धर्मांतरावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना, एका सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणार्यांमध्ये हिंदू आहेत. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. धर्मांतराचा सर्वाधिक फायदा ख्रिश्चन समाजाला मिळत आहे. सर्व्हेमध्ये सहभागी 0.4 टक्के लोक आधी हिंदू होते. दरम्यान, फक्त 0.1 टक्के लोक आधी ख्रिश्चन होते.
प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेनुसार, भारतात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणार्यांपैकी 74 टक्के लोक एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. सर्व्हेनुसार, हिंदू ज्यांना धर्मांतर करुन ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांच्यातील जवळपास अर्धेजण अनुसूचित जातीतले आहेत. तर, 14 टक्के अनुसूचित जमाती, 26 टक्के ओबीसीमधील आहेत. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्यांपैकी 45 टक्के लोकांनी भारतात खासकरुन अनुसूचित जातीसोबत भेदभाव केला जात असून, धर्मांतरण करण्याचं हेच कारण असल्याचं म्हटलं आहे.
असा केला सर्व्हे
हा सर्व्हे नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान, म्हणजेच कोरोनाच्या थोडा वेळ आधी करण्यात आला होता. या सर्व्हेत देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून 30 हजार ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. 17 भाषांमधील या नागरिकांसोबत समोरासमोर चर्चा करण्यात आली. त्याच्यात आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.