तलावाची स्वच्छता करण्यात यावी; ग्रामस्थांची सरपंचांकडे मागणी

। पाताळगंगा । वार्ताहर ।
काही दिवसांत गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र, काही गावांमध्ये विसर्जनाची सोय नसल्यामुळे शेकडो अंतर लांब जावे लागते. दरम्यान, माणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या माजगाव येथील तलाव पूर्ण भरला असून, त्यावर शेवाळ निर्माण झाली आहे.ती काढल्यास गणेश विसर्जन करणे सुकर होईल, या उद्देशाने सरपंच गोपीनाथ जाधव यांच्याकडे तलाव स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

या मागणीनुसार सरपंचांनी तलावाची पाहणी करून लवकरात लवकर शेवाळ काढण्यात येणार असल्याचे सांगितले. शेवाळ काढल्यास गणपती विसर्जनास कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी घाट बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या मागणीनुसार लवकरच या ठिकाणी तलावाची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. यावेळी जयेश पाटील, तेजस पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्‍वर भोईर, किशोर काठावले, संदीप काठावले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version