। मुरूड । प्रतिनिधी ।
गेली चार पाच दिवस पडलेल्या पावसामुळे मुरुड तालुक्यातील मुरुड-साळाव रस्त्यावरील विहूर पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होतअसल्याचे वृत्त वृत्त पत्रातून प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेत पुलावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे याठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले असून अपघातांची मालिका सुरुच आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अलिबाग-मुरुड राज्य मार्गावरील विहूर नदीवरील पुलाचा एक भाग वाहून गेला होता. त्या वेळी वाहतूक बंद पडली होती. या पुलावरील मोठं मोठे खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. हे वृत्त दि. 12 जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. 18 रोजी सा.बा.वि. विहूर पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी लगबग सुरू झाली असून सा. बां. विभागाने एकेरी वाहतूक मजबुतीकरण आणि सुरु केली होती. मात्र, डांबरीकरण पावसाळा आला तरी झालेच नाही. पुलाच्या रस्त्यावरील संरक्षण भिंतीचे बांधकाम अजूनही झालेले नाही. उलट पुलावरील रस्त्यावर अधिक मोठे खड्डे पडून अपघात घडत आहेत. अधिक पाऊस पडल्यास या पुलाचा भराव वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीं तरी रस्त्याची संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.