सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आजारी

| चिरनेर | वार्ताहर |

राज्यातील सर्वसामान्य, गरीबांना आवश्यक असलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच आजारी पडली आहे. यामुळे राज्यभर मृत्यूचे तांडव सुरू आहे. यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागले आहेत. या घटनांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या रायगड जिल्हा समितीने उरणच्या तहसिलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना उरणचे नायब तहसिलदार रविंद्र सानप यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे,भूषण पाटील,संजय ठाकूर,मधुसूदन म्हात्रे,रविंद्र कासुकर,शशी यादव आदी उपस्थित होते.

Exit mobile version