महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच

घटनापीठाकडून निर्णय होणार जाहीर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (दि.11) जाहीर होणार आहे, अशी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे” यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं ‘लाईव्ह लॉ’ नं म्हटलं आहे.

Exit mobile version