। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दणका दिल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. ऐन दिवाळीच्या सणात शेतकरी भातशेती कापणी, झोडणी यांच्या मागे असताना पावसाने दणका दिला आहे. निसर्गाने बळीराजाला पूर्ण नेस्तनाबूत करून टाकले आहे. तालुक्यात भात शेती हे एकमेव व्यवसाय असून, पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. यंदा भात पिकाचे प्रमाण बर्यापैकी असतानाच पावसाने शेतकर्यांना हैराण केले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांचे लवकरात लवकर पंचनामे करुन त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.