सामाजिक कार्याचा आत्मा – सुनील तटकरे,खासदार रायगड

अतिशय निस्वार्थीपणे गेले सहा-सात दशकं महाराष्ट्राची सेवा करणारे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. डावी विचारसरणी, पुरोगामी विचार हा त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा आत्मा होता. आपल्या विचारसरणीपासून कधीही एक क्षण सुद्धा ते विचलित झाले नाहीत. उलट ज्या ज्या वेळेला या विचारांवर हल्ला करण्याचा कोणी प्रयत्न केला त्यावेळेला उसळून ताकदीने या सार्‍या गोष्टीचा मुकाबला त्यांनी केला. सर्वसामान्य माणसाच्या सर्वदूर हितासाठीसाठी अत्यंत आक्रमकपणे लढवय्येपणाने आयुष्य भर झटत आले लढत आले. त्यांच्या जाण्याने एका पुरोगामी विचारांना महाराष्ट्राने गमावले आहे.

Exit mobile version