| उरण | वार्ताहर |
उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात झालेल्या बॉयलरचा स्फ़ोटातील जखमी झालेला तिसरा कर्मचारी कुंदन पाटील याचेही मंगळवारी दुपारी निधन झाले आहे.
या दुर्घटनेत ज्युनियर इंजिनिअर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा. उरण-डोंगरी) व लेबर विष्णू पाटील (रा. उरण बोकडविरा) हे जबर जखमी झाले होते. त्यातील धुमाळे यांचे त्याच दिवशी म्हणजे नधन झाले होते. बोकडविरा गावातील विष्णू पाटील या तरुणाचा सोमवार निधन झाले आहे. मयत विष्णू पाटील हे कंत्राटी कामगार असल्याने त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन म्हणून त्यांच्या पत्नीला केंद्रात कायमस्वरूपी नोकरी व 50 लाख रुपयांची नुकसानभरपाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचा प्रस्ताव केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी महाजनकोच्या संचालकांना पाठविला आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आ.भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी जखमींना व त्याच्या कुटूंबियांना योग्य न्याय मिळत नसल्याने मयत विष्णू पाटील यांचा मृतदेह कंपनी गेटसमोर आणून आंदोलन करण्यात आले होते. यानंतर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी जि..प सदस्य विजय भोईर, जेएनपीए माजी ट्रस्टी भूषण पाटील, शिवसेना नेते महादेव घरत, लक्ष्मण ठाकूर, संध्या ठाकूर, किरण घरत, दर्शन घरत व बोकडविरा डोंगरी, फुंडे व भेंडखळ सरपंच व सदस्य उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी सुप्रीडेंड इंजिनिअर एस. एल. वाघ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सरळ सरळ कंपनीच्या हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे कबूल केले. तसेच गेली 3 वर्षे सेफ्टी ऑफिसर व आरोग्य सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती वाघ यांनी पत्रकारांना दिली. यावेळी घटना घडूनही कंपनीत फिरत असताना सबधित अधिकारी वर्ग ही कोणतीही सुरक्षा उपकरणाचा वापर करीत नसल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. या कंपनीत अनेक प्रकारचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी राज्याचे ऊर्जामंत्री यांनी या घटनेचे व सुरक्षिततेचे गांभीर्य विचारात घेऊन याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे